ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून, तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी, २६ मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवारी, २७ मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग , घोडबंदर रोड, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी परिसराचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.
पुढील एक-दोन दिवसही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.